होय वनस्पती भावना व्यक्त करू शकणाऱ्या आहेत.वनस्पतींना पाणी देणे किंवा त्यांची काळजी घेणे यासारख्या क्रियांना वनस्पती वाढीद्वारे प्रतिक्रिया देतात.योग्य प्रमाणात पाणी व क्षार उपलब्ध झाल्यास फुलं तयार करणे हा सुद्धा वनस्पतींचा भावनात्मक प्रतिसाद आहे.या उलट एखाद्या वनस्पतीकडे दुर्लक्ष झाल्यास पाने फुले वाळून जाणे हा सुद्धा वनस्पतींचा भावनात्मक प्रतिसाद मानला जातो.प्राण्यांप्रमाणे चेतासंस्था नसल्यामुळे त्यांच्या भावनात्मक प्रतिक्रिया या लगेच दृश्य स्वरूपात दिसत नाहीत .या प्रतिक्रिया काही कालावधीनंतर दिसून येतात
वनस्पती संवेदनशील आहेत किंवा नाहीत या बद्दल बरयाच वेळेला विचारणा विद्यार्थी करतात.प्रतिसाद हा प्रत्येक सजीवांचा महत्वाचा गुणधर्म आहे.याला वनस्पती अपवाद नक्कीच नाहीत.प्राण्यांप्रमाणे यांच्यामध्ये चेतापेशी नसल्यामुळे प्रतिसाद हा अत्यंत मंद वेगाने असतो.प्रकाशाच्या दिशेने वाढणे तसेच मुळांची पाण्याच्या दिशेने होणारी वाढ हा देखील वनस्पतीचा प्रतिसाद आहे. लाजाळू सारख्या वनस्पतींमध्ये प्रतिसाद लगेच दिसून येतो. घटपर्णी सारखी कीटकभक्षी वनस्पतींमध्ये सुद्धा प्रतिसाद लगेच दिसतो. वनस्पती संगीत व ध्वनी यांना प्रतिसाद देतात हे प्रयोगाद्वारे सिद्ध झाले आहे.भारतीय थोर संशोधक डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी वनस्पतींचे हुंदके रेकॉर्ड केले आहेत.त्यांच्या संशोधनामध्ये त्यांनी दाखवून दिले कि कोबी चिरल्यानंतर मोठ्या प्रमाणात हुंदके देतो .वनस्पतींच्या संवेदनशीलतेवर विविध प्रकारचे प्रयोग झालेले आहेत.संगीताचा वनस्पतींच्या वाढीवर अनुकूल परिणाम होतो म्हणजेच त्यांना श्रवण क्षमता आहे.काही वनस्पती या नागाच्या फण्यासारखा आकार फुलांना धारण करतात,त्या वनस्पतींना आजूबाजूचे सजीव या प्राण्याला घाबरतात याची दृश्य...
उन्हाळा आला कि, पिवळ्या रंगाचे फुलाचे घोसच्या घोस येतात त्यांना मंद संगुध असतो त्याला Cassia fistula असे नाव आहे. याला ज्या शेंगा असतात त्यात गोड मगज म्हणजे गर असतो. फुले पिवळी व घोसाने येतात म्हणुन yellow shower plant असे नाव आहे.असे म्हणतात कि,या बहाव्याच्या फुले येण्याच्या कालावधी नंतर ४० दिवसात पाऊस येतो . च्य
Comments
Post a Comment